एखाद्या देशाची सुरक्षा देशाच्या सैन्यावर अवलंबून असते. बोलले जाते कि युद्ध बंदुकीने नव्हे तर सैनिकांच्या मानसिक मनोबलाने लढता येते. हे अगदी खरे आहे. पण सैनिकांचे आणि देशवासियांचे मनोबल वाढवायचे असेल तर, त्यांना त्यांचा संरक्षाणासाठी आपल्याकडे आवश्यक ती टेक्नॉलॉजी आणि शस्त्रास्त्रे आपल्या देशाकडे आहेत याची जाणीव करून दिली पाहिजे हे देखील तेवढेच खरे आहे. भारताची सैन्य शाक्ति जगातील सर्वात मोठ्या सैन्यांमध्ये गणली जाते. आपला देश पाणी, भूमी आणि वायु तिन्ही बाजुंनी तैनात आहे. आज देशाची मान जगासमोर अजून उंच करत भारताने अवकाशात पण शत्रूला मारण्याची यशस्वी चाचणी केली आहे. आता आपण जमिनीवरून अवकाशातील शत्रूला पण पाणी पाजू शकतो.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करून सांगितले कि भारत जगातील चौथा असा देश बनला आहे जो अवकाशातील उपग्रह नेस्तनाबूत करू शकतो. आपल्या भाषणात मोदींनी सांगितले कि भारत सरकार आणि डिफेंस रिसर्च एंड डेवलेपमेंट आर्गेनाइजेशन (DRDO) ने एंटी-सॅटेलाईट ए-सॅट (A-SAT) चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या मिशनचे नाव ‘मिशन शक्ती’ ठेवण्यात आले होते जो फक्त तीन मिनिटांत पूर्ण करण्यात आला.
मिशन शक्ती
* हे स्पेस मिशन डीआरडीओ ने पार पाडले आहे. भारताआधी फक्त अमेरिका, रशिया आणि चीनने असा कारनामा केला आहे.
* मिशन शक्ती मध्ये अवकाशात पृथ्वीच्या कक्षेत 300 किलोमीटर दूर लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटलाइट उडवून हे मिशन यशस्वी करण्यात आले आहे.
* मिशन शक्ती एक पूर्व निर्धारित होते आणि हैराणीची बाब म्हणजे हे कठीण मिशन फक्त तीन मिनिटांत पूर्ण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे साल 2012 मध्ये डीआरडीओ चे तत्कालीन चीफ विजय कुमार सारस्वत यांनी एका मीडिया इन्टरव्यू मध्ये सांगितले होते कि ‘भारतात अवकाशातील सॅटेलाईन नेस्तनाबूत करण्याची टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे, पण सध्या आम्ही याच्या चाचणीसाठी कोणतीही योजना तयार करत नाही.’ या इन्टरव्यू मध्ये सारस्वत यांनी अवकाशातील शास्त्रात्रांची तयारी असावी पण ते त्याच्या बाजूनी नाहीत. त्यावेळी डीआरडीओ प्रमुख म्हटले होते कि भारताची एंटी सॅटेलाईन सिस्टम थोडी ‘फाईन ट्यून’ करण्याची गरज आहे. आणि आज मोदींच्या नेतृत्वात भारताने ते पूर्ण केले आहे.
