Reliance Jio बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती कि कंपनी आपल्या नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन वर काम करत आहे जो खूप कमी किंमतीत लाॅन्च केला जाईल. या फोनची किंमत 50 डाॅलर सांगण्यात आली होती, जी 3,500 रुपयांच्या आसपास आहे. आता माहिती समोर येत आहे कि रिलायंस जियो नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये एक 4G फीचर फोन पण लाॅन्च करेल जो Jio Phone नावाने बाजारात येईल. कंपनीच्या या नवीन मोबाईल फोनची किंमत 1,000 रुपयांपेक्षा पण कमी असेल जो जियो बेनिफिट्स सह विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हा नवीन जियो 4जी फीचर फोनची माहिती ईटी रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार रिलायंस जियो भारतीय बाजारात अजून एक 4जी फीचर फोन लाॅन्च करण्याची योजना बनवत आहे. हा मोबाईल फोन 2021 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे मार्चच्या आधी मार्केट मध्ये येईल. या नवीन Jio Phone फोन बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि याची किंमत आधीच्या जियोफोन पेक्षा थोडी जास्त असेल पण याची किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल.
Jio Phone बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा डिवायस पण 4G VoLTE कनेक्टिविटी सर्विस सह लाॅन्च केला जाईल. रिपोर्टनुसार हा नवीन मोबाईल फोन नसून कंपनी जुना Jio Phone रिलाॅन्च केला जाईल. फोन रिलाॅन्च करण्यामागे कंपनीचा उद्देश नवीन ग्राहक जोडण्याचा आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि जियो फोन पुन्हा लाॅन्च करून कंपनी देशात ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देऊ इच्छितो.
हे देखील वाचा : रियलमीचा 5G फोन Realme X7 Pro येत आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला लिस्ट
Jio SmartPhone
रिलायंस जियोकडून मुकेश अंबानींनी सांगितले आहे कि कंपनी Google सह भागेदारी अंतगर्त नवीन अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम बनवत आहे. हि घोषणा करताना अंबानींनी स्पष्टपणे जियो स्मार्टफोनचे नाव घेतले नाही पण कंपनी 5G आणणार असल्याचे आणि अँड्रॉइड ओएस बनवणार असल्याच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी कमी किंमत असलेला स्वस्त Jio 5G SmartPhone पण भारतीय बाजारात लॉन्च करेल.
भारतात 5G सर्विस आणण्याच्या बाबतीत मुकेश अंबानींनी हि ‘आत्मनिर्भर भारत’ ला समर्पित करत सांगितले आहे कि कंपनी द्वारे विकसित केली जाणारी 5जी सर्व्हिस पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ असेल. अंबानींनी म्हटले आहे कि 5जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच, याचे ट्रायल सुरु होतील. फील्ड मध्ये वापरण्यासाठी पुढल्या वर्षी पर्यंत हि टेक्नॉलॉजी तयार केली जाऊ शकते. 5G बाबत आकाश अंबानींनी सांगितले कि हि टेक्नोलॉजी रिलायंस कर्मचाऱ्यांनी बनवली आहे.
