Home बातम्या Reliance Jio, BSNL आणि Airtel सह या कंपन्यांना बसला 35 कोटी रुपयांचा दंड, जाणून घ्या प्रकरण

Reliance Jio, BSNL आणि Airtel सह या कंपन्यांना बसला 35 कोटी रुपयांचा दंड, जाणून घ्या प्रकरण

TRAI अर्थात् टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडियाने वापरकर्त्यांना फेक एसएमएस पाठवण्याच्या केस मध्ये देशातील टेलिकॉम कंपन्यांना मोठा दंड ठोठावला आहे. ट्रायने या कंपन्यांवर वर एकूण 35 कोटी रुपयांचा फाइन लावला आहे. या 8 कंपन्यांमध्ये BSNL, Reliance Jio, Airtel, VI म्हणजे Vodafone Idea, MTNL, Tata Teleservices, Videocon आणि Quadrant Teleservices सारख्या नावांचा समावेश आहे ज्यांना दंड भरावा लागेल.

बातमीबद्दल सविस्तर सांगायचे झाले तर या कंपन्यांवर त्यांच्या नेटवर्कच्या त्या युजर्सची माहिती सायबर क्रिमिनल्सना वापरण्याची परवानगी दिली होती जे आपल्या फोन वर डिजिटल पेमेंट करण्यासाठी वॉलेट ऍप्सचा वापर करतात, असा आरोप आहे. हे डिटेल्स वापरून इंटरनेट वर फसवणूक करणाऱ्या लोकांनी मोबाईल युजर्सच्या नंबर वर फेक एसएमएस पाठवायला सुरवात केली होती, जे सायबर क्राईमच्या श्रेणीत येते. ट्रायनुसार या टेलिकॉम कंपन्यांनी टेलिकॉम कमर्शल कम्युनिकेशन कस्टमर प्रीफरेंस रेगुलेशनचे उल्लंघन केले आहे.

BSNL वर सर्वात जास्त दंड

या आठ कंपन्यांपैकी TRAI ने सर्वात जास्त दंड BSNL कंपनीला ठोठावला आहे. या सरकारी दूरसंचार कंपनीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम 30.1 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार या दंडाचा निर्णय घेण्याआधी ट्रायने बीएसएनएल ला ‘कारणे दाखवा नोटिस’ पण पाठवली होती, ज्याचे उत्तर कंपनीने दिले नाही. सोबतच बीएसएनएल परफॉर्मन्स मॉनिटरिंग रिपोर्ट पण ट्रायला दाखवू शकली नाही.

हे देखील वाचा : TRAI च्या या निर्णयामुळे Jio ला झटका, एयरटेल आणि वोडाफोनला दिलासा

कोणाला बसला किती दंड

बीएसएनएल नंतर फेक एसएमएस पाठवण्याच्या प्रकरणात सर्वात जास्त दंड Vodafone Idea ला लागला आहे. या दंडाची रक्कम 1.82 कोटी रुपये आहे. या लिस्ट मध्ये तिसऱ्या नंबर वर Quadrant Teleservices आहे जिला 1.41 कोटी रुपये दंड द्यावा लागेल तसेच यानंतर Airtel कंपनीचे नाव चौथ्या नंबर वर आले आहे जिला 1.33 कोटी रुपयांचा दंड द्यावा लागेल. रिलायंस जियो, एमटीएनएल व इतर कंपन्यांची नवे यादीत यांनतर आहेत.

प्रकरण आहे तरी काय

फेक एसएमएस आणि स्पॅम कॉलचा खेळ नवीन नाही. ग्राहकांना फेक एसएमएस पाठवणारे आणि स्पॅम कॉल करणाऱ्या अश्याच सर्विस प्रोवाइडरच्या विरोधात दिल्ली हायकोर्टाने ने सप्टेंबर मध्ये ट्रायला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच ट्रायनुसार कि या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या नेटवर्क वरून जाणारे एसएमएस योग्यरीत्या मॉनिटर केले नाहीत आणि त्यामुळेच त्यांना दंड भरावा लागला आहे. मॉनिटरिंग चुकीची झाल्यामुळे युजर्सना फेक एसएमएस आणि कॉल्स मिळत होते. ट्रायच्या या निर्णयाचा फायदा पेटीएम सारख्या डिजिटल पेमेंट कंपन्यांना नक्की होईल.