भारतात वेगाने वाढत असलेल्या अँटी-चायना सेंटिमेंट्समुळे चीनी मोबाईल कंपन्यांना जोरदार झटका लागला आहे. या भावना भारत-चीन सीमावादानंतर जास्त दिसल्या होत्या. या कारणांमुळे भारतीय ग्राहकांनी चायनीज कंपन्यांचा बहिष्कार केला. सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर) च्या एका रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कि सीमावादाचा सर्वात जास्त फायदा सॅमसंग आणि भारतीय मोबाईल ब्रँड लावाला झाला आहे. या रिपोर्टमसूर सॅमसंग भारतीय बाजारात सर्वात आवडीचा मोबाईल ब्रँड बनला आहे.
हा सर्वे यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर 2020 दरम्यान टियर-I आणि टियर-II शहरांमध्ये गेला होता. रिपोर्ट नुसार टियर -I शहरांच्या तुलनेत टियर-II शहरांमध्ये अँटी-चायना भावना जास्त दिसली. तसेच मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी चीनी स्मार्टफोन ब्रँड ऐवजी ग्लोबाल ब्रँड Samsung आणि Nokia ला पसंती दर्शवली आहे. सोबतच लोकल स्मार्टफोन ब्रँड Lava पण लोकांना आवडला आहे.
48 टक्के लोकांना आवडतात भारतीय फोन
सर्वे नुसार सॅमसंग, ओप्पो, वीवो आणि लावा कंज्यूमर्स म्हणतात कि ते त्यांच्या स्मार्टफोन्समुळे आनंदी आहेत. तसेच 48 टक्के लोक चीनी ब्रँड्सच्या ऐवजी लावा सारखे ऑप्शन बघत आहेत. मेड इन इंडिया R&D आणि डिजाइन असल्यामुळे भारतीय अनेक भारतीय ग्राहकांना लावा आवडत आहे.
73 टक्क्यांपर्यंत कमी झाली चीनी कंपन्यांची हिस्सेदारी
अमित शर्मा, विश्लेषक -इंडस्ट्री इंटेलिजेंस ग्रुप, सीएमआर यांच्यानुसार, ‘2020 च्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय मोबाईल बाजारात चायनीज कंपन्यांची हिस्सेदारी 73 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. याचे मुख्य कारण सप्लाय मधील कमतरता आणि चीन विरोधी भावना आहे. भारतातील चार पैकी एका रिटेलरला चीन विरोधी अभियानाचा सामना करावा लागला आहे.’
हे देखील वाचा : 3GB रॅम सह Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोन, समोर आले फीचर्स
सीमावाद आहे मुख्य कारण
सीएमआरच्या रिपोर्ट मधून माहिती मिळाली आहे कि भारतात सीमेवर चालू असलेल्या तणावामुळे लोक चीनी ब्रँड्सचा बहिष्कार करत आहेत. असे झाल्यामुळे शाओमी, रियलमी, ओपो, वीवो आणि दुसऱ्या कंपन्यांना नुकसान होऊ शकते.















