Airtel 5G Launch: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 1 ऑक्टोबर म्हणजे आज देशात 5जी सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. मोदींनी दिल्लीच्या प्रगती मैदानात आयोजित 4 दिवसांच्या इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) कार्यक्रमात 5जी सेवेचा शुभारंभ केला आहे. दरम्यान Bharti Airtel चे चेयरमन सुनील मित्तल यांनी घोषणा केली आहे की आजपासून भारतातील 8 शहरांमध्ये Airtel 5G Live (Airtel 5G network) होईल. चला जाणून घेऊया कोणत्या राज्यांमध्ये आजपासून Airtel 5G Service (Airtel 5G services starting today) लाइव्ह होणार आहे.
या 8 शहरांमध्ये लाइव्ह झाली Airtel 5G सर्व्हिस
Airtel 5G network आज म्हणजे October 1 पासून Delhi, Mumbai, Varanasi, Bangalore इत्यादी शहरांमध्ये लाइव्ह करण्यात येईल. IMC 2022 मधील आपल्या भाषणात Sunil Mittal यांनी सर्व 8 शहरांच्या नावाचा खुलासा केला नाही. भारती एंटरप्राइजेजच्या सीईओनी सांगितलं की 2024 पर्यंत संपूर्ण भारत कव्हर केला जाईल. त्याआधी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी Jio 5G रोलआउट योजनेचा खुलासा केला, ज्यात डिसेंबर 2023 पर्यंत प्रत्येक शहर आणि तालुक्यात 5G आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.
आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की एयरटेलची 5जी सेवा आज संपूर्ण दिल्ली, मुंबई, बँगलोर, वाराणसी आणि अन्य शहरांना कव्हर करेल की नाही. परंतु ग्राहक आजपासून या 8 शहरांच्या ठराविक भागांमध्ये एयरटेल 5जीचा वापर करू शकतील. हे देखील वाचा: प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट
5G Services Launched in India by PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज IMC 2022 म्हणजे इंडिया मोबाइल कांग्रेसच्या मंचावरून भारतात 5जी सर्व्हिस लाँच केली आहे. 5जी ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारत सरकारकडून Reliance Jio, Airtel आणि Vi सारख्या टेलीकॉम कंपन्यांना 5G Spectrum चं वाटप करण्यात आलं होतं, आजच्या लाँच नंतर या कंपन्या देशात आपली सेवा सुरु करू शकतील. 5G Services मध्ये मजबूत 5G Network सोबतच cloud gaming, AR/VR technology आणि IoT मध्ये आमूलाग्र बदल दिसेल परंतु सर्वसामान्य जनतेला ज्या गोष्टीची सर्वात जास्त प्रतीक्षा आहे ती म्हणजे सुपर फास्ट 5G Internet! 5जी लाँचनंतर भारतात इंटरनेट आता रॉकेट स्पीडनं चालेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
किती फास्ट असेल 5G
5G बद्दल लोकांच्या मनात सर्वात जास्त उत्सुकता हिच्या स्पीडमुळे आहे. सध्याच्या 4G चा टाॅप स्पीड 100mbps म्हणजे 100 मेगाबिट्स प्रति सेकंड आहे. तर 5G मध्ये हा स्पीड थेट 10GBPS (10 जीबी प्रति सेकंड) होईल. अर्थात 4जी पेक्षा 100 पट जास्त. तुम्हाला आठवत असेल की 3G नेटवर्कवर हा स्पीड 7.2mbps होता. आणि तरी सुद्धा जेव्हा 3जीची सुरुवात झाली होती तेव्हा मोबाइल युजर्स किती उत्साही होते. मग आता 5जी स्पीड जेव्हा तुमच्या स्मार्टफोनमध्ये चालेल तेव्हा काय होईल. हे देखील वाचा: 5G In India: फक्त काही तास शिल्लक! भारतात ‘5जी’ची प्रतीक्षा संपणार