फोन ब्लास्टला यूजर का जबाबदार? तुम्ही घाबरू नका लढा द्या

सध्या एकापाठोपाठ एक अनेक फोन ब्लास्टच्या बातम्या आल्या आणि जेव्हा आपण फोन ब्लास्टची बातमी ऐकतो तेव्हा थोडी भीती वाटतेच. कारण फोन आपल्या सर्वात जवळ असतो आणि जर हा ब्लास्ट झाला तर सर्वात जास्त शारीरिक नुकसान होण्याची भीती असते. परंतु फोन ब्लास्ट का होतो? आणि जेव्हा ब्लास्ट होतो तेव्हा कंपन्या मोबाईल यूजर्सना जबाबदार ठरवून आपले हात वर का करतात. हेच योग्य आहे का. कारण फोन लॉन्चच्या वेळी कंपन्या अनेक वायदे करतात पण काही खराब होताच सर्व दोष यूजर वर टाकला जातो. चला तर मग जाणून घेऊया कि खर्च यूजर जबाबदार आहे का आणि जर नसेल तर मग कंपनीने यूजर वर दोष टाकून भरपाई देण्यास नकार दिला तर तुम्ही कशाप्रकारे कादेशीर कारवाई करू शकता.

का होतो फोन ब्लास्ट

मोबाईल मध्ये वापरल्या जाणाऱ्या लीथियम आयन बॅटरी मध्ये तीन प्रकारच्या रसायनांचा वापर होतो. कोबाल्ट ऑक्साइड पॉजिटीव्ह इलेक्ट्रोड ज्याला कॅथोड म्हणतात. तर दुसऱ्या भागात ग्राफाईड कार्बन नेगेटिव इलेक्ट्रोड ज्याला ऍनोड म्हटले जाते. तर तिसरा भाग इलेक्ट्रोलॉयट केमिकलचा असतो.

मोबाईल बॅटरी निर्मितीच्या वेळी कॅथोड आणि ऍनोड वेगवेगळे ठेवले जातात. याना वेगळे ठेवण्यासाठी साठी इन्सुलेशन टेप, प्लास्टिक स्ट्रीप किंवा मग रबर स्ट्रीपचा वापर केला जातो. परंतु हे दोन्ही केमिकल जर मिळाले तर फोन ब्लास्ट होतो. मोबाईल मध्ये बॅटरी व्यतिरिक्त ब्लास्ट होण्यालायक काहीच नसते. हे केमिकल काही कारणास्तव एकमेकांमध्ये मिसळू शकतात जसे कि एखादा शॉर्ट सर्किट, मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट, जास्त हीटिंग किंवा मग जास्त दबाव.

यूजर आहे का दोषी

फोन ब्लास्ट झाल्यावर यूजर दोषी मानला जातो आणि केस बंद केली जाते. परंतु सांगू इच्छितो कि अधिकांश प्रकरणात यूजर दोषी नसतो. कंपन्या दोषी आहेत. पुढे आम्ही उदाहरण देऊन सांजवाले आहे आणि सोबत यात सुप्रीम कोर्टाचे वकील आणि सायबर लॉ एक्सपर्ट पवन दुग्गल यांचे मत पण मांडले आहे.

1. मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट: याला तुम्ही निर्मिती दोष पण म्हणू शकता. फोनच्या निर्मितीच्या वेळीच समस्या होऊ शकते आणि या कारणामुळे पण फोन ब्लास्ट होतो. जसे गॅलेक्सी नोट 7 मध्ये झाले होते फोन ब्लास्टच्या बातम्यांमुळे सॅमसंगने संपूर्ण लॉट परत मागवला होता. यावेळी कंपनीने आपली चूक मान्य केली होती पण प्रत्येकवेळी असे नाही होत. कंपन्या काही बहाणा काढून यूजर वर दोष टाकतात जेणेकरून त्यांची प्रतिमा बिघडू नये.

यूजर आहे का जबाबदार: यूजर बिलकुल जबाबदार नाही. याबाबाबत पवन दुग्गल म्हणतात कि “जर फोन ब्लास्ट झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीची असते. कंपनी असे नाही म्हणू शकत कि यूजरची चूक आहे. कारण कोणताही यूजर स्वतःहून आपल्या फोन मध्ये आग लावणार नाही. निर्मितीच्या वेळी काही गडबड झाली असावी त्यामुळे फोन ब्लास्ट होतो. अधिकांश कंपन्या जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत त्यामुळे ती यूजर वर टाकली जाते.”

2. खराब चार्जरचा वापर करणे : फोन ब्लास्ट होण्यामागे दुसरे कारण आहे नकली किंवा अनब्रँडेड चार्जरचा वापर करणे आणि कंपन्यांचे सर्वात मोठे हत्यार हेच असते. फोन ब्लास्ट होताच कंपन्या म्हणतात कि यूजरने नकली चार्जरचा वापर केला असेल त्यामुळे फोन ब्लास्ट झाला आणि आम्ही जबाबदार नाही.

यूजर आहे का जबाबदार: असे बिलकुल नाही जर फोन ब्लास्ट खराब चार्जर मुळे झाला तरी कंपनीच दोषी आहे. याबाबत पवन दुग्गल म्हणतात “जेव्हा तुम्ही डिवाइस घेता तेव्हा रोजच्या दैनंदिन वापरासाठी घेता. त्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल कि नकली चार्जर वापरला किंवा पाणी टाकल्यामुळे खराब होत असेल तर हे कारण कायद्यात बसत नाही. कंपन्या अनेक प्रकारच्या टेस्ट आणि टेक्निकल रिपोर्ट करता आणि हे केल्यानंतर फोन लॉन्च करतात. त्यानंतर ग्राहकांना आकर्षित करतात कि या आमचा प्रोडक्ट विकत घ्या. इतक्या सर्व गोष्टी करून पण तुम्ही त्या नाकारता. त्यामुळे जर फोन ब्लास्ट झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर येते.”

हि गोष्ट बरोबर आहे. कारण जर खराब चार्जरमुळे पावर सप्लाई जास्त होत असेल किंवा कमी होत असेल तर फोन ऑफ व्हावा ब्लास्ट नाही. जर ब्लास्ट होत असेल तर कंपनीची जबाबदारी आहे. जर नकली चार्जरच्या वापरामुळे फोन ब्लास्ट होत असेल तर रोज एक दोन नव्हे तर हजारो फोन ब्लास्ट झाले पाहिजेत. या सर्व गोष्टी यूजरला घाबरवण्यासाठी आहेत.

3. लिक्विडमुळे : अनेकदा कंपन्या म्हणतात कि फोन मध्ये पाणी गेल्यामुळे किंवा लिक्विड डॅमेज होता त्यामुळे फोन ब्लास्ट झाला. परंतु हे चुकीचे आहे. पवन दुग्गल यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे कि कायद्यात हे कारण चालत नाही. हे यूजरला गोंधळात टाकण्यासाठी आहे.

यूजर आहे का जबाबदार: भारतातील वातावरण उष्ण आहे इथे घाम किंवा कुठूनही पाणी जाऊ शकतो. अश्यावेळी फोन बंद झाला पाहिजे ब्लास्ट नाही. फोन खराब झाला तर यूजर जबाबदार असू शकतो पण ब्लास्टसाठी कंपनी जबाबदार आहे.

4. चार्जिंगच्या वेळी कॉलिंग: असे म्हटले जाते कि चार्जिंगच्या वेळी कॉल किंवा मेसेज केल्यास फोन ब्लास्ट होऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य आहे कि वापर करू नये पण जर ब्लास्ट होत असेल तर हि कंपनीची चूक आहे. त्यांचा फोन खराब आहे.

यूजर आहे का जबाबदार: यूजर जबाबदार नाही. जर असे झाले तर तुम्ही भरपाई मागू शकता. फोन मध्ये सिस्टम आहे ज्यामुळे चार्जिंगच्या वेळी तुम्ही कॉलिंग करता तर त्यात कोणतेही नुकसान झाले नाही पाहिजे.

5. ओवर हीटिंग किंवा खूप गरम होणे: ओवर हीटिंग किंवा फोन गरम झाल्यामुळे फोन ब्लास्ट होतो. अनेकदा कंपन्या फोन ओवर हीट होत होता त्यामुळे ब्लास्ट झाला असे बोलून वाचतात. पंरतु फोन मध्ये थर्मल लॉक सिस्टम असते जी फोन जास्त गरम झाल्यावर तो ऑफ करते.

यूजर आहे का जबाबदार : याबाबतीत पण यूजर जबाबदार नाही. हे फोनच्या तांत्रिक बिघाडामुळे होते आणि जर हीटमुळे फोन ब्लास्ट झाला तर कंपनी जबाबदारी ठरते. तुम्ही नुकसान भरपाई मागू शकता.

6. वजन भरपूर पडणे : अनेकदा भरपूर वजन पडल्यामुळे पण फोन ब्लास्ट होतो.

यूजर आहे का जबाबदार : याबाबतीत यूजर जबाबदार आहे. तुम्ही काळजी घ्यावी कि फोन वर जास्त वजन पडू नये.

कशी करावी कंपनी वर कारवाई

तुम्ही बघितले कि जास्तीत जास्त वेळा फोन ब्लास्ट झाल्यावर कंपनी जबाबदार असते. परंतु कंपनी ग्राहकांची तक्रार घेण्यास नकार देत असेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता.

याबद्दल पवन दुग्गल म्हणतात “फोन ब्लास्ट झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कंपनीला लेखी तक्रार करावी लागेल आणि ब्लास्ट आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात एफआईआर नक्की करा. जर तुम्ही ऑनलाइन रिपोर्ट करू इच्छित असाल तर https://cybercrime.gov.in/ वर जाऊ शकतो. या नंतर पण कंपनीने तुमची तक्रार ऐकली नाही तर मग तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करू शकता. तुम्ही तुमच्या जिल्हा न्यायालयात, राज्य किंवा नॅशनल कमिशन मध्ये आपली कंज्यूमर पेटिशन दाखल करू शकता. तसेच तुम्ही आईटी ऍक्टचे स्पेशल कोर्ट हातात तिथे पण जाऊ शकता. भारतीय संविधान सेक्शन 79 आईटी ऍक्ट अंतर्गत यावर कारवाई करता येते.”

ते असे पण म्हणले कि “जर कंपन्या ऐकत नसतील तर तुम्ही हे प्रकरण आपल्या सोशल मीडिया वर टाका. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर वर जास्तीत जास्त शेयर करा ज्यामुळे हे प्रकरण प्रकाशझोतात येईल. त्यामुळे त्यांची इमेज खराब होऊ नये म्हणून कंपनी लवकरात लवकर कारवाई करण्यास मजबूर होईल.”

फोन ब्लास्ट मध्ये किती असावी नुकसान भरपाई

याबाबत पवन दुग्गल म्हणतात कि ”ग्राहक संरक्षण कायदा म्हणतो कि जेवढे नुकसान झाले आहे तेवढी नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल. जर फोन ब्लास्ट मध्ये चेहरा, डोळे किंवा कानाला इजा झाली तर भरपाई जास्त असेल. तसेच जर शारीरिक इजा झाली नाही तर कोर्ट म्हणू शकतो कि खराब सामानाच्या बदल्यात नवीन सामान द्या आणि थोडी नुकसान भरपाई वेगळी द्या.”

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here