Jio 555 रुपये, Airtel 558 रुपये, Vodafone 569 रुपये, जाणून घ्या कोण देतो किती फायदा आणि करतो किती नुकसान

इंडियन टेलीकॉम कंपन्यांची स्पर्धा लपलेली नाही. प्रत्येक कंपनी स्वतःला सुधारण्यात आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या स्वस्तात जास्त बेनिफिट देणारे प्लान्स घेऊन येत असतात. या प्लान्सचा थेट फायदा यूजर्सनाच होतो. पण अनेकदा ग्राहक गोंधळात पडतात कि कोणती कपंनी चांगली आहे आणि कोणाचा प्लान घेण्यात त्यांचा फायदा आहे. तसे बाजारात प्रत्येक बजेट मध्ये प्लान्स आहेत. पण आज आम्ही 500 रुपयांपेक्षा जास्त किंमतीतले प्लान्स आणले आहेत. आम्ही Reliance Jio च्या 555 रुपये, Bharti Airtel च्या 558 रुपये आणि Vodafone च्या 569 रुपयांच्या प्लान्सची तुलना केली आहे, जेणेकरून तुम्हाला कळावे कि कोणत्या कंपनीच्या प्लान मध्ये फायदा काय आहे आणि नुकसान काय?

किंमत

सर्वात आधी प्लान्सची किंमत पाहिली तर हे तिन्ही प्लान 500 रुपयांपेक्षा जास्त बजेट मध्ये येतात. Reliance Jio च्या प्लानची किंमत 555 रुपये आहे, Bharti Airtel ने आपला प्लान 558 रुपयांमध्ये सादर केला आहे तर Vodafone च्या प्लानची किंमत 569 रुपये आहे.

म्हणजे Airtel च्या प्लानची किंमत Jio च्या प्लान पेक्षा 3 रुपये जास्त आहे तर Vodafone चा प्लान Jio पेक्षा 14 रुपये महाग आहे.

वैधता

Jio, Airtel आणि Vodafone तिन्ही कंपन्यांचे प्लान दीर्घ वैधतेसह येतात, म्हणजे यूजरना एका रिचार्ज नंतर पुढचे अडीच महिने कोणताही बदल करण्याची गरज पडत नाही. Jio चा 555 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो तर Vodafone च्या 569 रुपयांच्या प्लानची वैधता पण 84 दिवस आहे. तर Airtel ने आपला प्लान 82 दिवसांच्या वैधतेसह सादर केला आहे.

इंटरनेट डेटा

Jio आपल्या 555 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा देत आहे. म्हणजे पूर्ण प्लानच्या वैधतेमध्ये यूजर्सना एकूण 168 जीबी (84 x 2 = 168) इंटरनेट डेटा मिळेल.

Airtel आपल्या यूजर्सना 558 रुपयांच्या प्लान मध्ये Jio पेक्षा जास्त रोज 3 जीबी 4G डेटा देत आहे. एयरटेलच्या प्लान मध्ये संपूर्ण वैधतेसाठी एकूण 246 जीबी (82 x 3 = 246) 4जी इंटरनेट डेटा मिळेल.

Vodafone च्या 569 रुपयांच्या प्लान मध्ये पण Airtel प्रमाणे रोज 3 जीबी 4G डेटा मिळत आहे. तिघांची तुलना केल्यास Vodafone सर्वात जास्त एकूण 252 जीबी (84 x 3 = 252) 4जी इंटरनेट डेटा देत आहे.

हे देखील वाचा: Jio ने दिला अजून एक झटका, या प्लानची वैधता कमी करून केली 24 दिवस

कॉलिंग

या तिन्ही कंपन्या आपल्या यूजर्सना फ्री अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देण्याचा शब्द देतात. पण Jio च्या प्लान मध्ये ऑननेटवर्क कॉलिंग तर पूर्णपणे फ्री आहे परंतु ऑफनेटवर्क कॉल करण्यासाठी कंपनीने फक्त 3000 मिनिट्स दिले आहेत. तर Airtel आणि Vodafone ने आपल्या यूजर्ससाठी वॉयस कॉल पूर्णपणे फ्री ठेवले आहेत. ऑननेटवर्क व ऑफनेटवर्क दोन्ही वर अनलिमिटेड वॉयस कॉल करता येतात.

किती फायदा आणि किती तोटा

Reliance Jio चा प्लान जरी Airtel आणि Vodafone च्या प्लान्सच्या तुलनेत 3 रुपये आणि 14 रुपयांनी स्वस्त असले तर बेनिफिट्सच्या बाबतीत Airtel चा 558 रुपयांचा प्लान तसेच Vodafone चा 569 चा प्लान Jio च्या 555 रुपयांच्या प्लानच्या तुलनेत जास्त फायदे देतात. Jio नंबर वर IUC मिनिट्स वापरून कॉलिंग करता येईल तर Airtel आणि Vodafone यूजर्स पूर्णपणे मोफत अनलिमिटेड कॉल करू शकतील.

हे देखील वाचा: Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट

रोजच्या डेटाच्या बाबतीती Airtel व Vodafone यूजर्सना Jio च्या पेक्षा रोज 1 जीबी 4G डेटा जास्त मिळेल. तर संपूर्ण प्लान मध्ये Airtel नेटवर्क वर Jio च्या तुलनेत 78 जीबी जास्त डेटा तसेच Vodafone यूजर्सना जियोच्या तुलनेत 84 जीबी डेटा अधिक मिळत आहे. तसेच Vodafone नेटवर्क वर Airtel पेक्षा 6 जीबी जास्त डेटा तसेच 2 दिवसांची जास्त वैधता पण मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here